पाच मिनिटांच्या पाच साधना
पाच मिनिटांच्या पाच साधना (भाग ४ - चक्र धारणा)
कुंडलिनी योगशास्त्रानुसार मेरूदंडाच्या आतून सुषुम्ना नामक एक प्राणनाडी गेलेली
आहे जी च्या मार्गावर सहा महत्वाचे बिन्दु किंवा स्थानं आहेत. या बिंदूंना चक्रं
म्हटलं जाते. चक्र धारणेच्या या प्रकारात या सहा चक्रांना हळुवारपणे जागृत केले
जाते. ही चक्रे प्राणाची मुख्य स्थाने असल्याने त्यावरील ध्यानाने शरीर आणि
मनावर सुपरिणाम घडून येतो. कुंडलिनी योगशास्त्रात चक्र, नाड्या आणि प्राण ही
संकल्पना खूपच विस्ताराने वर्णन केली आहे. त्या विषयाच्या फार खोलात न जाता ही
साधना सोप्या प्रकारे कशी करायची ते येथे पाहणार आहोत.
ही साधना करण्या आगोदर तुम्हाला वर उल्लेखलेल्या सहा चक्रांची स्थाने
माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी
हा लेख उपयुक्त ठरू शकेल.
- घरातल्या एखाद्या शांत खोलीत किंवा देवघरात साधंनेकरता आसन घाला. आसन
म्हणून चादरीची चौपदरी घडी आणि त्यावर सूती पंचा वापरू शकता.
- डोळे मिटून शांत चित्ताने क्षणभर बसा.
- आता शरीराला आतून बघण्याचा प्रयत्न करा. अशी कल्पना करा की तुमची शरीर पोकळ
असून त्वचा आवरणासाखी शरीराची बाह्याकृती दर्शवत आहे.
- आता आपली जाणीव मेरूदंडाच्या तळाशी अर्थात मूलाधार चक्राशी ठेवा. येथे फक्त
जाणीव ठेवणे पुरेसे आहे. फार एकाग्रता जमली नाही तरी हरकत नाही.
- आता मूलाधार चक्राचा बीजमंत्र - लं - तीनदा मनातल्या मनात स्पष्टपणे
उच्चारा. मनातल्या मनात मंत्रोच्चारण कठीण वाटत असेल तर सुरवातीला हळू आवाजात
मोठयाने मंत्र म्हणायला हरकत नाही.
- आता जाणीव मूलाधारा पासून काढून ती स्वाधिष्ठान चक्रा पाशी ठेवा.
स्वाधिष्ठान चक्राचा मंत्र आहे वं. त्याचेही पूर्वीप्रमाणे तीनदा उच्चारण करा.
- याच प्रकारे माणिपूर, अनाहत, विशुद्धी आणि आज्ञा या चक्रांपाशी जाणीव ठेऊन
त्यांचे मंत्र (जे अनुक्रमे रं, यं, हं आणि ॐ आहेत) तीन वेळा उच्चारा.
- हे या साधनेचे अर्धे आवर्तन झाले.
- अर्ध्या आवर्तंना नंतर तुम्ही आज्ञा चक्रापाशी पोहोचलेले असाल. आता जसे वर
गेलात त्याच्या उलट क्रमाने खाली या - आज्ञा, विशुद्धी, अनाहत, माणिपूर,
स्वाधिष्ठान आणि मूलाधार. प्रत्येक ठिकाणी पूर्वीप्रमाणेच त्या त्या चक्राचा
मंत्र म्हणा.
- मूलाधाराशी परत आल्यावर या साधनेचे एक आवर्तन पूर्ण झाले.
- अशी एका मागून एक आवर्तने १, ३, ५, ११, २१ अशा पटीत करा. सुरवातीला पाच
मिनिटांत किती आवर्तने बसतात ते मोजा आणि मग तेवढी आवर्तने करा. जर अधिक वेळ
देऊ शकत असाल तर आवर्तने वाढवा.
या साधनेने शरीरातील अंतःस्थ ग्रंथी आणि मज्जा रज्जु यांना प्राण शक्तीचा मुबलक
पुरवठा होतो. परिणामी आरोग्यावर सुपरिणाम होतो. कुंडलिनी जागृतीसाठी ही साधना
उपयुक्त आहे. ही सहा चक्रे म्हणजे पंचमहाभूते आणि मन यांचे जणू मुख्य वसतिस्थान
आहेत. त्यामुळे पंचतत्वांची शुद्धीही या साधेनेत होते.
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो
की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे.
अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम